9 SIM Card Limit Sanchar Saathi Alert
तुमच्या नावावर 9 पेक्षा जास्त SIM कार्ड आहेत का? मग सावध व्हा! दूरसंचार विभागाकडून (DoT) मोबाइल कनेक्शनच्या निर्धारित मर्यादेची अंमलबजावणी अधिक कडक करण्यात येत आहे. बहुतेक भारतात एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त 9 मोबाइल कनेक्शन ठेवण्याची मर्यादा आहे. जम्मू-काश्मीर, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांसाठी ही मर्यादा 6 मोबाइल कनेक्शन आहे.
24 ऑगस्ट 2026 पासून निर्धारित मर्यादेपर्यंत पोहोचलेल्या ग्राहकांच्या मोबाइल कनेक्शनची पडताळणी अधिक कडक पद्धतीने केली जाणार आहे. नवीन मोबाइल कनेक्शन देण्यापूर्वी ग्राहकाच्या नावावर आधीपासून किती कनेक्शन आहेत, याची तपासणी केली जाणार आहे.
या प्रक्रियेमध्ये दूरसंचार विभागाच्या Digital Intelligence Platform (DIP) च्या माध्यमातून ग्राहकांच्या ओळख आणि छायाचित्राशी संबंधित पडताळणीचा वापर केला जाणार आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त कनेक्शन असल्यास अतिरिक्त कनेक्शनवर नियमांनुसार कारवाई होऊ शकते.
तुमच्या नावावर अनोळखी SIM आहे का? _ 9 SIM Card Limit Sanchar Saathi Alert
अनेकदा जुना मोबाइल नंबर वापरात नसतो किंवा एखाद्या व्यक्तीच्या कागदपत्रांचा गैरवापर करून तिच्या नावावर SIM काढला जाऊ शकतो. अशा नंबरचा गैरवापर सायबर फसवणूक, बनावट कॉल, OTP गैरवापर किंवा इतर गैरप्रकारांसाठी होण्याची शक्यता असते.
त्यामुळे नागरिकांनी Sanchar Saathi पोर्टलवर जाऊन आपल्या नावावर किती मोबाइल कनेक्शन नोंदणीकृत आहेत, हे तपासणे महत्त्वाचे आहे.
तुमच्या नावावर असलेला एखादा नंबर तुमचा नसल्याचे किंवा आता आवश्यक नसल्याचे आढळल्यास Sanchar Saathi वरून त्याची नोंद करता येते.
नागरिकांनी काय करावे? _ 9 SIM Card Limit Sanchar Saathi Alert
- आपल्या नावावर किती मोबाइल नंबर आहेत ते तपासा.
- अनोळखी किंवा वापरात नसलेले SIM कनेक्शन ओळखा.
- गरज नसलेल्या कनेक्शनबाबत संबंधित प्रक्रिया पूर्ण करा.
- OTP, KYC किंवा वैयक्तिक कागदपत्रांची माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका.
- संशयास्पद मोबाइल कनेक्शन आढळल्यास त्वरित संबंधित यंत्रणेला कळवा.
- ही माहिती आपल्या कुटुंबीय आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवा.
सायबर फसवणूक टाळण्यासाठी तुमच्या नावावर किती SIM कार्ड आहेत, हे आजच तपासा.
प्रतिनिधी : दिपक सरोदे _ 9 SIM Card Limit Sanchar Saathi Alert


[…] […]